Wednesday, May 11, 2011

यु पी एस सी पूर्वपरीक्षेसाठी साठी काही सूचना

यु पी एस सी पूर्वपरीक्षेसाठी साठी काही सूचना

यु पी एस सी च्या नवीन प्रश्नपद्ध्तीबद्दल आपण जाणले आहेच. आता वेळ आली आहे प्रत्येक भागाला हात कसा घालायचा याची. गेल्याच वेळेस नमूद केल्याप्रमाणे आपण जरी हे भाग १ ते ७ क्रमांकाने पहिले तरी ते आपल्या सोयीसाठी होते हे लक्षात घ्यावे . परीक्षेत हे असेच येतील याची हमी नाही. त्यांचा क्रम व संख्या ठरविण्याचा अधिकार केंद्रीय लोकसेवा आयोगाचा आहे.

तरीही पुन्हा एकदा आपल्या सोयीसाठी म्हणून आपण विभागवारच विचार करू.

COMPREHENSION :
यात उताऱ्यावरून प्रश्नोत्तरे सोडवावी लागतात. आयोगाने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकावरून असे दिसते की उतारा हिंदी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये येऊन शकतो. आपल्या आकलनाप्रमाणे भाषा निवडावी. या भागात विषयांना मर्यादा नाही. इतिहास, विज्ञान, अभियांत्रिकी, भूगोल, साहित्य, चालू घडामोडी, माहिती तंत्रज्ञान, संस्कृती तसेच अगदी स्थापत्यशास्त्र, कशाचीही हमी देता येत नाही. १ मार्क एक प्रश्न असे समीकरण असेल. यासाठी काही तयारी लागेल. सर्वप्रथम भाषेवर प्रचंड पकड लागेल. वाचनाची सवय व आवाका जबरदस्त लागेल. त्याचप्रमाणे म संपूर्ण एकाग्र करून उताऱ्याचे मोठे आकलन लागेल.

हे उतारे से हाताळावेत?
सर्वात पहिली खबरदारी म्हणजे उतारे वाचण्यात जास्त वेळ घालवू नये. याचे प्रमुख कारण असे की उतारा वाचून जर प्रश्न वाचला तर काहीच आकलन झाले नाही हे कळते. आणि तो उतारा पुन्हा एकदा वाचवा लागतो. कारण आपण त्याप्रकारे वाचन केलेलेच नसते आपण कायमच जनरल वाचन करतो. म्हणून कोणताही उतारा प्रथम वाचताना आपण अगोदर प्रश्न ध्यानात ठेवलेला कधी उत्तम. (हाच तो टिपिकल यु पी एस सी अभ्यास). म्हणून पहिला प्रश्न आणि मग वाचन हे सूत्र ध्यानात ठेवावे, (हो अगदी परीक्षेच्या वातावरणातसुद्धा). अगदीच जर जमत नसेल तर उताऱ्यावरून उभी नजर मारावी. आपल्याला कोणताही उतारा नजरेखालून घातल्यावर कळून येईल की सुरवात तर एकदम झोकात झाली आहे. मात्र उतारा मध्येच भरकटलेला आहे. म्हणजे कलकत्याहून धुळ्याला येणारी गाडी एकदम गोव्याला भोज्या करून आली आहे असे वाटेल. कारण मध्येच विषयाला फाटे फुटतात आणि नवीन नवीन उदाहरणे येत राहतात. सरतेशेवटी गाडी पुन्हा एकदा मूळपदावर येते आणि प्रवास झोकातच संपतो. (उतारा मोठा असतो तेंव्हा हे होते, लहान उताऱ्यात हे भरकटणे फार दिशाहीन होत नाही). एकूणच काही विशेष मर्म उलगडत नाही. मात्र प्रश्न आगोदर वाचला असेल तर ह्या गोष्टी होत नाहीत. तसेच वाचन अधिक नेमके आणि वेगवान होते. चकवा देणाऱ्या प्रश्नांना अधिक वेळ देता येतो. भाषेवर हुकुमत असल्यास प्रश्न कसा वळवला आहे ते अधिक समजेल. आणि यातून उतारा अधिक चांगल्या पद्धतीने उलगडतो ते वेगळेच.

मध्ये किंवा एक प्रश्न येईल तो म्हणजे उताऱ्याला समर्पक नाव काय द्याल?
उताऱ्याचा पहिला व शेवटचा परिच्छेद वाचला की हा प्रश्न उलगडतो (शेवटी गाडी कुठे पोहोचली आहे ते महत्वाचे.) अशा प्रश्नांना तेवढेच केले तरी चालू शकते. आपण आपले म्हणणे मांडताना हेच करीत असतो. आपण विषय मांडतो वेगवेगळ्या उदाहरणांतून तो सिद्ध करतो व पुन्हा एकदा समाप्ती करतो. परत परीक्षे मध्ये -ve मार्किंग असते. त्यामुळे चुकलेल्या प्रश्नांना मार्क जात असतात. त्यामुळे सगळे प्रश्न सोडवायचेच नसतात.

व्यक्तिगत संवाद कौशल्य:व्हो

व्याकरण आणि भाषेची उत्तम जाण याला पर्याय नाही. याकरण तर इतके पक्के हवे की प्रश्न विचारल्यावरच मनात उत्तर यायला हवे. काळ, त्याप्रमाणे बदलणारे वाक्य, बदलणारी क्रियापदाची रूपे, शब्दांच्या सर्व जाती, विरामचिन्हे, प्रथम पुरुष, द्वितीय व तृतीय पुरुष, एकवचन अनेकवचन, अगदी शब्दाच्या संदर्भाबरोबर बदलणारी spellings (उदा. reach rich तसेच break brake असे सारखे वाटणारे शब्द.) यांवर आधारित हा भाग असेल. गाळलेल्या जागा भर तसेच वाक्य पुरा करा अश्या स्वरूपाचे प्रश्न यात येतात. यात एक नमूद करायला हवे की मराठी व्याकरणाची साथ व त्यावर असलेली पकड यात उत्तम साथ देते कारण मराठी व्याकरणातल्या शब्दांच्या जाती इंग्रजीवरच आधारलेल्या आहेत. तसेच काळावर येणारे प्रश्नही मराठीशी साम्य असणारे आहेत. म्हणूनच मराठी माध्यमाची मुले हा भाग उत्तम सोडवतील अशी आशा बाळगायला हरकत नाही.

तर्कनिष्ठता.

तल्लख बुद्धिमत्ता असलेल्या मुलांनाही गोंधळात टाकणारा हा प्रकार आहे असे म्हणता येईल. ५ W व १ H विचारणारा हा भाग आहे. ५ W म्हणजे WHO , WHAT , WHEN , WHERE , WHY व १ H म्हणजे HOW . यात एखादा ५ ओळींचा उतराही विचारला जाऊ शकतो. वैज्ञानिक प्रश्न (जे अगोदर क्वचित विचारले गेले आहेत) येऊ शकतात. व्यक्तींमधील नातेसंबंध (कोण कुणाचा कोण), कार्यकारणभाव (कारणीमिमांसा - REASONING ) यात येऊ शकते. यातही प्रश्नांचा आढावा घेतल्यास मग उतारा ध्यानात घेणे कधीही चांगले. शक्य तेंव्हा कागद व पेन्सिल वापरलेली बरी. पुन्हा यात विषयांची मर्यादा नसते. आगोदर उल्लेखिलेल्या विषयांपैकी कोणतेही प्रश्न असतील. समीकरणे, जोड्या व वेगवेगळी combinations विचारली जाऊ शकतात. अनेकदा दिलेल्या माहितीवरून एखादे कोष्टक तयार होते. वेळात वेळ काढून सरळ एखादे कोष्टक तयार करावे. त्यावरून माहिती चटकन मिळते व उत्तरे सोडवता येतात. मात्र कोष्टक तयार करायलासुद्धा एक पद्धत असते. म्हणून सराव करणे खूपच महत्वाचे आहे.

निर्णयक्षमता व समस्यानिवारण : तल्लख, बुद्धिमान, सचोटीचे व कर्तव्यदक्ष अधिकारी निवडण्यासाठी त्यांची अगदी ही म्हणजे अगदी पदार्पणातली कसोटी ठरावी. हा भाग महत्वाचा आहे. कमीत कमी वेळात हे प्रश्न सोडविण्याला महत्व आहे. अगदी अडचणीच्या गोष्टी विचारल्या जाऊन विद्यार्थ्याची विवेकबुद्धी कितपत शाबूत आहे हे बघितले जाईल. अधिकारी झाल्यावर ज्या ज्या आव्हानांना तोंड द्यावे लागते त्यांची ही पायाभरणी म्हणूया. आयोगाचा अभ्यासक्रम व परीक्षापद्धती ही वास्तवतेशी निगडीत नाही असा जो आरोप गेली काही वर्षे होत होता त्याची परिणीती म्हणजे हा विभाग आहे असे म्हणता येईल. प्रश्न पुन्हा पुन्हा वाचावा लागला तरीही चालेल. पण उत्तर अचूक मिळण्यासाठी जागरूक वाचन जरुरीचे आहे. प्रश्न वाचूनच वाचन करावे. सोडवलेल्या प्रश्नांवर फार मनन करू नये.

या सर्व विभागांवरून एक गोष्ट लाखात घ्यावी की प्रश्न चालू घडामोडींवर सुद्धा विचारले जाऊ शकतात. मात्र त्यांची उत्तरे आपल्या साठवलेल्या ज्ञानावरून नव्हे तर उपलब्ध प्रश्नांवरूनच द्यायची असतात.

बुद्धिमापन. :भूमिती, बीजगणित, त्रेराशिके यावरून प्रश्न येऊ शकतात. गणितांची सूत्र लक्षात ठेवणे कधीही उपयोगी असते. अनेकदा गणिताशी वैर पत्करलेले असते. ते न ठेवल्यास उत्तम. सगळीच गणिते कठीण नसतात. काळ, काम, वेगाची गणिते, वये, भूमिती व त्यांवर आधारित प्रश्न, बीजगणित, probability, द्युतातल्या सोंगट्यावर आधारित गणिते, भूमितीय आकारांचे आकलन व त्याची अचूक उत्तरे यात असतील. ज्याला गणितात गती आहे त्याच्यासाठीही हा भाग आव्हानात्मक असतो. probability जरी असली तरी टी नेहमीच कठीण असते असे नाही व सर्वच प्रश्न त्यावर असत नाहीत. हे सांगायचे कारण असे की याच्याच धास्तीमुळे मुले गणिताला टाळतात.

परीक्षेत पाळायची काही तत्वे.

  1. पेपर पूर्ण बघावा. नंतर मोठे उतारे असू शकतात. त्यातून वेळेचे नियोजन करता येईल.
  2. मध्येच पेपर कठीण असतो. तेंव्हा घाबरून जाऊ नये. शांत राहावे. कारण पेपर्स च्या सिरीस वेगवेळ्या असतात. त्याप्रमाणे कठीणपणा मागे पुढे होतो.
  3. प्रसंगावधान ठेवावे. चित्त शांत ठेवावे.
  4. सुरवात कायम कठीण प्रशांनी होते असे आढळून आले आहे. पहिल्या २ ओव्हर्स मेडन गेल्यावरसुद्धा मोठी धावसंख्या उभारता येते.
  5. एकूणच यात आपल्याला हैराण करायचा डाव असतो हे लक्षात घ्यावे व त्याप्रमाणे पुढे जावे.

केल्याने होत आहेरे आधी केलेची पाहिजे

पुढच्या लेखापासून परीक्षेचा अधिक विस्ताराने व टप्या टप्याने अभ्यास करू.

Sunday, May 8, 2011

यु पी एस सी चे बदललेले स्वरूप : चर्चा आणि वस्तुस्थिती:

यु पी एस सी चे बदललेले स्वरूप : चर्चा आणि वस्तुस्थिती:

म्हणता म्हणता केंद्रीय लोकसेवा आयोगाने आपले बदललेले स्वरूप लोकांसमोर आणलेच. अपेक्षेप्रमाणे पहिला वैकल्पिक विषयाचा पेपर गेला. आता आयोगाने सामान्य ज्ञानाचा पेपर कायम ठेऊन एक बुद्धिमत्ता चाचणीसारखा नवीन प्रकार आणला आहे. भारत सरकारच्या निर्णयाप्रमाणे जून २०११ च्या परीक्षेत प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आता बदललेले असेल. पैकी पहिल्या प्रश्नपत्रिकेबद्दल बरेचसे लिहून वाचून बोलून झाले असेलच. सामन्यात: येणारे दरवर्षीसारखे प्रश्न यंदा येतील असेल म्हणायला हरकत नाही. दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत २०० वस्तुनिष्ठ प्रश्नांना २०० गुण आहेत व याला वेळ आहे २ तास.


प्रश्नपत्रिकेचा हा दुसरा भाग म्हणजे तितकीच महत्वाची मेख आहे. विद्यार्थ्याच्या केवळ तयारीची नव्हे तर एकूणच वकूबाची परीक्षा पाहणारी ही नवी पद्धती असेल. सर्वात महत्वाची बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी की आयोगाला कधीच कोणी गृहीत धरलेले चालत नाही. परीक्षेची एखादी पद्धत ठरून गेली की तिचा पायंडा पडून राहतो. ती पास होण्याचे ठाकतोळेही ठरून जातात. प्रक्रियेतले नाविन्य संपते. तोच तोच पणा येतो. आणि कोण परीक्षा पास होणार याची गृहीतकेही ठरून जातात (आणि बऱ्याचदा ती बरोबरही ठरतात) नेमके हेच आयोगाला टाळायचे होते. एकाच प्रकारे जर परीक्षा पास होता येत असेल तर निवड झालेले अधिकारीसुद्धा एकाच तऱ्हेचे असण्याचा धोका असतो.

यु पी एस सी ची चाचणी अथवा पूर्व परीक्षा ही गाळणी स्वरुपाची असते. आयोगाच्याच शब्दात स्पष्ट सांगायचं तर जे विद्यार्थी अत्यंत गांभीर्याने तयारी करून परीख देतात त्यांच्याचसाठी परीक्षेचा पुढील टप्पा असतो. यात जिंकू किंवा मारू अशीच वृत्ती हवी. शत्रू कोण आहे हे माहित नसेल तर तो कोणीही असेल हे गृहीत धरायला हवे. तो कुठून वार करेल हे कळत नसेल तर कुठूनही करेल हे माहित असायला हवे, त्याच्याकडे शस्त्रास्त्रे कोणती हे ठाऊक नसेल तर जास्तीत जास्त संहारक असू शकतात हे ध्यानात घ्यायला हवे. त्यांचा डावपेच कोणता असेल हे आपण जाणत नसू तर तो वाटेल तो डाव खेळू शकतो हे आपल्याला कळायला हवे. म्हणजेच ही पूर्व परीक्षा पास होणे म्हणजे येऱ्यागबाळ्याचे काम नोहे, तेथे पाहिजे जातीचे हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे. हे युद्ध आहे आणि युद्धात सारं काही क्षम्य असतं.

या सर्व बाबी गृहीत धरून आयोगाने परीक्षेत बदल केले आहेत. केवळ सामान्य ज्ञानात नव्हे तर भाषेच्या ज्ञानात व ज्ञानाच्या भाषेत (इंग्रजी) विद्यार्थी किती प्रवीण आहे हे आता बघितले जाणार आहे. तर मित्रांनो आता तयार राहा एका नव्या आवाहनासाठी, नव्हे, एका नव्या विजयासाठी.

यु पी एस सी चा दुसरा पेपर अनेक अंगांनी अधिकारी बनण्याची क्षमता बघतो असे मानावे लागेल. यात इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चाचणी तर्क व निर्णय क्षमता यासारख्या घटकांचा समावेश होतो. आपण प्रथम संपूर्ण प्रश्नपत्रिकेचा आढावा घेऊ.

पहिला घटक आहे उताऱ्यावरून प्रश्नोत्तराचा. शाळेच्या जीवनात आपण यांचा अभ्यास केलेला असतो. उतारे मोठे असू शकतात. यात विविध विषय हाताळले जाऊ शकतात. उदा: दोन व्यक्तींमधले संभाषण, वर्तमानपत्रातला एखादा परिच्छेद इत्यादी. उतारे मोठे आहेत म्हणून वेळ अर्थातच वाढवून मिळत नाही. मोठ्यातले मोठे उतारे अतिशय वेगाने वाचून काढले जायला हवेत. यासाठी भाषेवरील जबरदस्त हुकुमातीचा केंव्हाही फायदा जास्तच. कारण त्यामुळेच तर मोठ मोठाले उतारे चुटकी सरशी वाचून त्यांचे उत्तम आकलन होऊ शकते. यामुळे वेळाही वाचतो आणि आत्मविश्वासही वाढतो. हे उतारे इंग्रजी अथवा हिंदीत असतील.
दिलेल्या प्रश्नांची उत्तरे कमीत कमी वेळात द्यावी लागतात. यात वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतात त्यामुळे लिहित बसायची गरज नाही. दिलेल्या ४ पर्यायांमधून १ योग्य पर्याय निवडावा लागतो. सरतेशेवटी जवळपास सर्वच उताऱ्यांमध्ये त्यास साजेसं नावही विचारला जातं.

प्रश्नपत्रिकेतला दुसरा भाग असणार आहे व्यक्तिगत संवाद कौशल्याचा. प्रामुख्याने यात येतील ती व्याकरण निगडीत प्रश्नोत्तरे. अचूक ठिकाणी योग्य शब्द घालणे, दिलेल्या वाक्यातला चुकीचा शब्द ओळखणे, योग्य शब्दाला आणखी एखादा अचूक पर्याय देणे, व्याकरणातली चूक शोधून काढणे, योग्य संवाद निवडणे, शब्दाची योग्य जात जिथल्या तेथे लावणे, भूत भविष्य वर्तमान यातल्या चुका ओळखणे अथवा वाक्याचा रोख तसा करणे या महत्वाच्या गोष्टी यात येतील.

तिसरा भाग असेल तार्किक व विश्लेषणात्मक बुद्धीचा. हा भाग आपले बुद्धिमापन करीत असतो. दिलेल्या प्रश्नांचे अचूक उत्तर यात अपेक्षित असेल. कोण, काय, कसे, कधी, कोणाला, का, कुठे, या सर्व गोष्टी यात येतात. आपला मेंदू नेहमीच अलर्ट आहे की नाही आपले प्रसंगावधान कसे आहे या बद्दल सर्व प्रश्न असतील. एखादा अत्यंत लहान उतारा अथवा मोठे वाक्य यात येईल वार त्याचे postmortem करणारे प्रश्न विचारले जातील. एकूणच विद्यार्थ्याची आकलनक्षमता, विश्लेषणात्मकता, तर्कक्षमता, विचारक्षमता व निर्णयक्षमता यांचा कस लावणारा हा भाग असेल हे वेगळे सांगायला नकोच.

चौथा भाग आहे निर्णयक्षमता व समस्या सोडविण्याच्या ताकदीचा. चांगला अधिकारी हवा तर तो तडफेने निर्णय घेणारा हवा. कठीण काळातही डोकं शांत ठेऊन आपल्या तर्काला व विवेकाला स्मरून निर्णय घेणारा हवा. आणीबाणीच्या कळत तर त्याच्यावर सगळी जबाबदारी असते. लहान वयात अधिकार हातात आल्यावर त्यासाठी तो सक्षम आहे की नाही हेही यातून बघितले जाईल.

पाचवा भाग असेल सामान्य बुद्धिमापन क्षमतेची कसोटी बघणारा. हा भाग गणितावर आधारित असेल. काळ, काम, वेगाची गणिते, वये, भूमिती व त्यांवर आधारित प्रश्न, बीजगणित, probability, द्युतातल्या सोंगट्यावर आधारित गणिते, भूमितीय आकारांचे आकलन व त्याची अचूक उत्तरे यात असतील. ज्याला गणितात गती आहे त्याच्यासाठीही हा भाग आव्हानात्मक असतो. गणितात ज्याला गती तो हुशार गणला जातो (ते योग्य की अयोग्य हे ठरविण्याची ही जागं नव्हे) त्यामुळे या भागाशिवाय कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा पूर्ण होत नाही हे ध्यानात येईल.

सहावा भाग असेल आकड्याच्या खेळाचा. आकडे, त्याचे एकमेकांशी संबंध, त्याची क्रमवारी इत्यादी यात येईल. हा सर्व भाग १० वी NCERT पातळीचा असेल. यातच पुढे माहितीचे संकलन, त्यावरून विचारले जाणारे प्रश्ना यात येतील. अधिकारी होण्यासाठी या सर्वांची माहिती असणे अत्यंत आवशयक आहे. आलेख, स्तंभालेख, वर्तुळालेख , कोष्टके, व त्याप्रमाणे त्याची उत्तरे देणे तसेच अचूक आलेखांची निवड हे सर्व यात येईल. हा सर्व भाग १० वी NCERT पातळीचा असेल.

शेवटचा भाग इंग्रजी उताऱ्याच्या आकलनाचा असेल. पूर्वपरीक्षा हिंदी अथवा इंग्रजीत देता येते हे तर आपणास माहित आहेच. मात्र हा भाग केवळ इंग्रजीत असेल वयात पर्याय केवळ इंग्रजीत असतील. इंग्रजी उताऱ्याच्या आकलनाचा हा भाग १० वी NCERT पातळीचा असेल. याचे भाषांतर उपलब्ध करून दिले जाणार नाही.

आपण जरी हे भाग १ ते ७ क्रमांकाने पहिले तरी ते आपल्या सोयीसाठी होते हे लक्षात घ्यावे. परीक्षेत हे असेच येतील याची हमी नाही. त्यांचा क्रम व संख्या ठरविण्याचा अधिकार केंद्रीय लोकसेवा आयोगाचा आहे. सात भाग असले तरी प्रत्येक भागात अमुक मार्क मिळाले तरच पास होता येईल असे विभागीय अर्हता धोरण आयोगाचे नाही. तसेच विद्यार्थ्याला उत्तीर्ण करण्याचा अधिकार सर्वार्थाने आयोगाकडे आहे.

एकूणच आपल्यासमोर एक चक्रव्यूह मांडला गेला आहे याची आपल्याला कल्पना आली असेलच. आता चक्रव्युहात शिरायचे आहेच पण तो भेदण्यासाठी हे प्रत्येकाने ध्यानात धरावे. आपली क्षमता जोखावी, आपला कल जोखावा व कौशल्य तपासावे. माझा सहकारी गणित उत्तम सोडवतो म्हणून मी गणितांना प्रथम हात घालावा हे धोरण आत्मघातकी आहे. प्रत्येकाची स्वत:ची खास क्षमत असते व तीच त्याची ओळख असते. त्याप्रमाणे प्रत्येकाने स्वत:ला घडवायला हवे. प्रत्येकाचा मार्ग निराळा आहे.

सर्वसामान्य गोष्टी म्हणजे वेळेचे नियोजन, उत्तम मेहनत, मानसिक तयारी, अभ्यासाचे उत्तम साहित्य, आणि प्रश्न साद्वायचा सर्व. या सर्वांबद्दल पुढच्या वेळेस.