Saturday, January 5, 2013

शहिन प्रकरणतला धडा

शाहिन धाडा या मुलीच्या फ़ेसबुक स्टेटस वरुन सध्या वाद्ळ उठलय. "बाळासहेबाञ्च्या निधनाबद्द्ल बन्द काय ठेवता गडे???" असा या मड्डम चा सवाल आहे। याहिपेक्षा भयानक आहे ती तिची भाषा. " एका राजकारण्याच्या मृत्यूबद्दल, तेही नैसर्गिक, संपुर्ण शहर बंद का??" असा तिचा सवाल आहे. तिचा पुढचा प्रश्न असा की आपण भगतसिंग राजगुरू बद्दल कधी 2 मिनिटे तरी शांत बसतो का? माणसे काय रोजच्या रोजच मरत असतात त्यांच्या बद्दल आपणकधी मौन बाळगतो का??बाळासाहेबानबद्दल कोणी काय बोलावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असेलही.. बंद ला पाठिंबा द्यावा की नाही हे मत व्यक्तकरायचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण चीड आणणारी. आहे ती तिची भाषा. "एका राजकारण्याच्या???" म्हणजे राजकारण्याचा मृत्यू आणि सामान्य माणसाचा मृत्यू सारखाच का? तिच पुढच लिहीण अस की मान हा मागून मिळत नाही तो मिळवावा लागतो. म्हणजे ही बया ठरवणार की बाळासाहेब मोठे होते की नाही. 7 किलोमीटरच क्षेत्रफळ व्यापून राहिलेली गर्दी हिला दिसली नाही? 20 लाखापेक्षा जास्ता संख्येने आलेली माणसे हिला बघता आली नाहीत का? आणि हो हे अस काहीतरी ही तामिळनाडूत किवा बंगालमध्ये बरळु शकेल का? प्रश्ना मराठी अमराठीचा नाहीच. तथाकथित अभिजन वर्गात आज राजकारण्याबद्दल जी घृणा साचून राहिली आहे त्यातून हा उद्दामपणा येत असतो. अमिताभ, सचिन, लता, आणि अशी अनेक नामांकित मंडळी त्यांना भेटून गेली ती काय धमक्या आल्या म्हणून?? पंतप्रधानांनी आपला डिनर कार्यक्रम पुढे ढकलला शोक व्यक्त केला , राष्ट्रपतींनी आपला दौरा रद्द केला ते काय शिवसेनेने सांगितले म्हणून? या मॅदम ची पुढची तर कमालच आहे. we are resilient by force and not by choice. अस काही बाही ती लिहून गेली आहे. म्हणजे काय? resilient या शब्दाचा अर्थ आहे 'पूर्ववत होणे'. मग हिला नक्की काय म्हणायचे आहे? हा संवाद A WEDNESDAY चित्रपटात नसिरुद्दीन शाह च्या तोंडी दहशतवादी हल्ल्यातून सवरण्या बद्दल चा आहे. काय म्हणायचा काय या शाहीन ला? हिला इंग्रजी येत नाही का? मग लिहिते बोलते कशाला? अडाणी असण हा गुन्हा नाही. पण त्याची मीजास होता नये. आणि ज्या प्रकारे इंग्रजी आणि इतर वर्तमानपत्रे या अडाणी पणाला मिजशिच स्वरुप देत आहेत ते पाहता ही वृत्ती वेळीच आवरली जायला हवी.

No comments:

Post a Comment